Skip to content

:)

आजचा सुविचार - गाढवाच्या मागे आणि बॉसच्या पुढे कधीही उभे राहू नये.

मी आणि माझा ब्लॉग

एप्रिल 15, 2013

यार, काय बोलू? प्रतिक्रिया वाचून हसावं की रडावं अस होते आहे. माझा ब्लॉग माझी भलतीच इमेज बनवतोय. कधी ज्योतिषी, कधी इतिहासकार तर कधी कधी हा ‘हेमंत’ वेडा. खर तर ‘हेमंत’ ना ज्योतिषी ना इतिहासकार. ‘वेडा’ म्हटल्यावर माझी काही हरकत नाही. कारण, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विषयात वेडा असतोच. Read more…

संभाजी महाराज

एप्रिल 10, 2013

आजचा दिवस, जगातील एकमेव ‘अजेय’ व्यक्तिमत्वाचा. त्याच्या अखेरच्या क्षणांचा. त्याच्या आधी आणि नंतर देखील असा ‘वीर’ पुन्हा या पृथ्वीवर अवतरला नाही. नेपोलियन असो. सिकंदर असो. किंवा कोणताही इतिहासात वीर घ्या. त्याच्या आयुष्यात त्याला कधी न कधी ‘तह’ किंवा ‘पराभव’ स्वीकारावा लागलेला आहे. जवळपास एकशे बत्तीस लढाया संभाजी महाराज लढले आणि जिंकले सुद्धा. Read more…

अबोल

एप्रिल 4, 2013

यार, काय बोलू! हे माझ अस झालं आहे न. काय बोलू आणि काय नको. बोलावसं बरच वाटत. पण प्रश्न पडतो कस बोलू. म्हणजे काही विषय असे असतात. की जे असून नसतात. म्हणजे, साक्षीदार देखील आपण आणि आरोपी देखील आपण. गुन्हा घडतो. त्या ठिकाणी गुन्हा आपल्याच हातून घडत असतो. कितीही प्रयत्न केला, मनात ते असतेच. आपण आपल्या अशा अनेक गोष्टी, मनात  दडवून ठेवतो. Read more…

लग्नाआधी आणि नंतर…

एप्रिल 3, 2013

लग्ना आधीच जीवन आणि लग्नानंतर होणारा जीवनातील बदल, यातील सुखी कोणते वगैरे गोष्टी कदाचित वादाचा विषय होवू शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर यात फरक असतो. जर फरक पडलेला नसेल. तर मग ‘अवघड’ आहे. Read more…

प्रश्न

फेब्रुवारी 20, 2013

प्रश्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रश्न निर्माण होतात. त्याच्या उकली सापडतांना जीवन वेगवेगळ्या अंगांनी बदलत जाते. बदल हा सृष्टीचा (न बदलणारा) नियम आहे. Read more…

प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?

फेब्रुवारी 7, 2013

उत्तर- इसवी सन २००४ पासून भारत नावाच्या देशामध्ये मनमोहन नावाचा राजा राज्य करीत होता. गुणी, सद्गुणी, हुशार असा आहे समज समस्त देशात पसरलेला होता. तो आला आणि देशाचे चित्रच पालटून गेले. दु:खी असलेले प्रजाजन अधिकच दु:खी होवू लागले. राजाच्या निर्णयाचा फटका सर्वच लोकांना बसू लागला. राजाच्या मंत्रिमंडळातील मंत्री रोजच खजिन्यावर धाडी टाकू लागले. शेजारील देश तर रोजच हल्ले करू लागले. Read more…

भगवंताची उणीव

फेब्रुवारी 1, 2013

जीवनरूपी महासागरात, त्या भगवंताची उणीव का जाणवते? त्याचा अंश असलेल्या व्यक्ती पाहिल्यावर, त्याची ओढ अधिकच का जाणवू लागते. परीस्पर्श झालेला असतांना देखील ती ओढ अधिकच व्याकूळ करते. कर्तव्य की साधना याचीच गल्लत होते. धर्म कर्तव्य पालनाची आज्ञा देतो. आणि भक्ती भगवंताच्या साधनेची.

साधनेत भगवंत भेटीचा आनंद मिळतो. तरीही भगवंत भेटीची ओढ कायम राहते. हा जीव त्या भगवंतासाठी आसुसलेला आहे. कर्तव्याचे पालन करतांना नामस्मरण चालूच असते. भक्तीमध्ये लीन होवून या भवसागरातून तरून जाण्याचा खटाटोप.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 117 other followers