Skip to content

:)

एक साप : काय रे, आपण विषारी की बिनविषारी?

दुसरा साप : का?

पहिला साप : अरे, मी आत्ताच माझी जिभ चावली...

विश्व

जानेवारी 11, 2012

प्रत्येकाचे वेगवेगळे विश्व. विश्व नेमके कोणते हाच प्रश्न पडावा इतके भिन्न भिन्न विश्व. कुणाला संगीताची आवड. तर त्याला जिकडे तिकडे सुरांच्या मैफिली दिसतात. तर कुणी, ‘राजकारण’ पाहून त्यात रमलेले. प्रत्येकाला, आपआपल्या विश्वात आणि त्यात असणाऱ्या/जाणवणाऱ्या गोष्टींचे अप्रुफ. आणि प्रत्येकाला त्या विश्वातून डोके काढून बाहेर पाहायला वेळच नाही. प्रत्येकाची ‘जीवनाची’ समीकरणे वेगवेगळी. आणि प्रत्येकाच्या ‘सूत्रांनी’ आणि त्यांच्या अनुभवाच्या प्रमेयांनी जीवनाची गणिते सोडवून बाकी शून्य आलेली. Read more…

कोंबडी कोणी पळवली…

डिसेंबर 21, 2011

नेत्यांच्या स्टाईलने…

महात्मा गांधी – कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.

लोकमान्य टिळक – कोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय? Read more…

कर वाचवण्याचे सोपे पर्याय

डिसेंबर 17, 2011

कर वाचवण्याचे अनेक पर्याय सध्याला उपलब्ध आहेत. कर वाचवणे पेक्षा ‘स्वतःची कमाई’ वाचवणे जास्त संयुक्तिक राहील. त्यातील काही सोपे पर्याय. ‘पीपीएफ अकाऊंट’ बद्दल कदाचित जाणत असाल. ‘पब्लिक प्रोव्हिडंट फंड’ कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेतून ‘पीपीएफ अकाऊंट’ उघडून सध्याच्या नियमानुसार प्रत्येक वर्षाला सत्तर हजारापर्यंत रक्कम करमुक्त केली जावू शकते. आणि नवीन नियमानुसार. जो येत्या आर्थिक वर्षानुसार त्याची मर्यादा एक लाखापर्यंत वाढवली गेलेली आहे. Read more…

स्वतःवर ताबा

डिसेंबर 16, 2011

स्वतःवर ताबा ठेवणे, कदाचित जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणजे, सकाळी साखर झोपेतून उठतांना ते रात्री विचार चक्रे थांबवून शांत झोपण्यापर्यंत स्वतःवर ताबा ठेवण्याची कसरत करणे फारच जिकीरीचे काम असते. कदाचित, काही गोष्टीत स्वतःवर ताबा ठेवणे काहींना सहज शक्य असेल. पण, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा असून देखील एखाद्या विशिष्ट कारणामुळे ती गोष्ट न करण्याचे बंधन घालणे खुपच कठीण असते. आता फक्त स्वतःवर बंधन घालणे, याचाच अर्थ स्वतःवर ताबा असणे असा नव्हे. Read more…

माथेफिरू

नोव्हेंबर 27, 2011

हे सर्टीफिकेशन खुपंच कमी लोकांना मिळते. आणि हे टिकवणे त्याहून अवघड. कोणी संताने नमूद म्हटले आहे नां ‘जया अंगी माथेफिरूपण| तया यातना कठीण||’ खर आहे म्हणा. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. दोनशे बळी घेऊन देखील कसाबला ‘आरोपी’ आणि ‘दहशतवादी’वरच समाधान मानावे लागले. कसाब काय आणि राजा काय. आणि राजू काय आरोपीच्याच सर्टीफिकेशन पर्यंत जाऊ शकतात. एवढेच काय नक्षलवादी देखील फार फार तर ‘दहशतवादी’ सर्टिफिकेट मिळवू शकतील. कारण, ‘माथेफिरू’ची परीक्षा तितकी अवघड आहे. ‘गुरु’जी सुद्धा संसदेत केलेल्या हल्ल्यानंतर जेमतेम ‘गुन्हेगार’ सर्टिफाईड होवू शकले. Read more…

क्षमा असावी.. महाराज

नोव्हेंबर 18, 2011

राजे आम्हाला क्षमा करा! खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल? कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं? वर्तमान काय वर्णावा. आपले मावळे, आपल्याच मावळ्यांची उणीदुणी काढत बसले आहे. कुणा मावळ्याला वाटत माझीच जात ‘लय भारी’. आणि दुसऱ्याची जात ‘राक्षसाची’. बर राजे तुम्हीच सांगा. Read more…

बेगरफिशर

नोव्हेंबर 15, 2011

कसला गहजब चाललाय? अस काय झालं की, ढग कोसळल्याप्रमाणे सगळीकडून आरडाओरड चालू झाली? आम्ही त्या बिचाऱ्या ‘बेगरफिशर’ला मदत करायची काय ठरवली की, सर्वच उठून बोलायला लागले. बघा कस आहे की, आधी सरकार काही करत नाही म्हणून ओरडायच.. आणि करतो म्हटलं की, तरीही टाहो फोडायचा. दुसरा काम धंदा नाही काय? तो गरीब ‘विजय ढोल्या’ आमच्या दरबारी शरण आला. शरण आलेल्याच रक्षण करणे हा आमचा धर्मच आहे. तसं आम्ही ‘निधर्मी’ आहोतच. Read more…

का?

नोव्हेंबर 12, 2011

प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो ‘का?’ डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी ‘का?’ म्हणत ‘का?’ येतो. या विचाराने मन खजील होते. Read more…

आयटीतील म्हणी

ऑक्टोबर 16, 2011
  • मायक्रोसॉफ्ट तिथ बग.
  • पीएम आला आणि लेक्चर देवून गेला.
  • आपला तो टास्क दुसऱ्याचा तो टाईमपास.
  • रात्र थोडी टास्क फार. Read more…

अण्णा यांस

ऑक्टोबर 9, 2011

‘प्रौढ’ प्रताप पारनेर, एनजीओ कुलावतंस, राळेगण प्रतिपालक, उपोषणाधीश्वर, अण्णांना हजारदा दंडवत.

इनंती इशेष, आपली ती परवाची पत्रकार परिषद ऐकली. ऐकून काळजाचा ठोका चुकला. म्हणून पत्राचा खटाटोप केलाय. तुम्ही बाळासाह्यबास्नी लई वंगाळ बोललात. म्हंजी कस हाय माउली, त्या रामलीला मैदानावरचा तो तुमच्यातला अचल, निश्चल सूर्य पाहिल्यावर. अख्खा देश त्या सूर्याच्या प्रकाशाने न्हाहून गेला. दहा-बारा दिवस का असेना. तुमच्यामुळ आम्हाला खरी ‘लोकशाही’ पाहायला मिळाली. माउली, तुमच्या उपोषणान त्या संसदेला नमवल. एक देशाची वज्रमूठ बनली. आणि या सरकार, प्रसासन आणि भ्रष्टाचाराबद्दल मनातील चीड, राग मोकळा करायचा मार्ग मिळाला. तुम्ही म्हटलं अगदी तसाच्या तस देशान केल. आणि म्या सुद्धा. Read more…

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 77 other followers